दहीहंडीच्या कार्यक्रमात “तुम्हाला आवडलेली मुलगी उचलून आणू”, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चिराग नगर (घाटकोपर) पोलीस स्थानकात राम कदम यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यासाठी नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्ष आदिती नलावडे आणि विद्यार्थी अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी पोलीस स्थानकातच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत पोलीस एफआयआर नोंदवत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे चिराग नगर, घाटकोपर पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन. पोलीस @ramkadam यांच्याविरोधातील एफआयआर नोंदवून घेत नसल्यामुळे आमदार विद्या चव्हाण, मुंबई युवती अध्यक्ष आदिती नलावडे, महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर यांचे ठिय्या आंदोलन.. @adi_nal @supriya_sule @chitrancp pic.twitter.com/Jcl8lWy0mq
— My Mahanagar (@mymahanagar) September 5, 2018
भाजप आमदार ‘रावण’ कदम यांच्या फोटोला काळे फासत आणि चपलांचा मारा करत महिलांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान आमदार राम कदम यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करायला तयार नसल्याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राम कदम यांच्या घरावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी राम कदम यांच्या फोटोला काळे फासून, जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
भाजपचे आमदार राम कदम यांनी दहिहंडीच्या उत्सवात महिलांबद्दल केेलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. @vidyachavan12 यांच्या नेतृत्वात राम कदम यांच्या घरावर
धडक मोर्चा काढला. pic.twitter.com/9u7ra4H2TT— NCP (@NCPspeaks) September 5, 2018
तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि पशु व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकार यांना घेराव घालून राम कदम यांनी केलेल्या विकृत वक्तव्याबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.
@BJP4Maharashtra च्या विलासी रामाच्या वक्तव्यावर राज्याचे सांस्कृतिक मंत्री @TawdeVinod यांना घेराव घालून विचारला जाब @NCPspeaks @supriya_sule @Jayant_R_Patil @ANI pic.twitter.com/GEW59bPw99
— Chitra Kishor Wagh (@chitrancp) September 5, 2018
तत्पूर्वी चित्रा वाघ यांनी राम कदम यांचे विधान हे रामाला शोभणारे नसून रावणाला शोभणारे आहे. परंपरेनुसार विजयादशमीला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, मात्र राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
मुजोर राम्याचा पुतळा दहन @NCPspeaks @supriya_sule @Jayant_R_Patil @ANI pic.twitter.com/P9gqvPUmwb
— Chitra Kishor Wagh (@chitrancp) September 5, 2018