लोकसभा निवडणूकीत कोकणामध्ये शिवसेनेने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणेचा दारुण पराभव केला. मात्र आता पराभवानंतर नेहमीप्रमाणे निलेश राणे यांनी पुन्हा एकदा आपली पालळी ओलाडंत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी टीका करताना निलेश राणेंची जीभ घसरली आहे. निवडणूक लढवायला हिम्मत लागते. विजय किंवा पराभव होत असतो पण दुसऱ्यांच्या लाटेवर निवडणून येणारे हिजड्यांसारखे फक्त तिकीट वाटप करु शकतात.
निवडणूक लढवायला हिम्मत लागते… विजय किव्हा पराभव होत असतो पण दुसऱ्यांच्या लाटेवर निवडून येणारे हिजड्यांसारखे फक्त टिकिट वाटप करू शकतात. https://t.co/N0LeVKuaR2
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 28, 2019
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. अशातच निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. निलेश राणेंनी ट्विटरच्या माध्यातून केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. आदित्य ठाकरेंना निवडणूक लढवण्याची हिंमत आहे का? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याआधीच टीकांची झोड, आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा युतीला ४८ पैकी ४१ जागा मिळाल्या. यामध्ये शिवसेनेने १८ तर भाजपाने २३ जागी विजय मिळवला आहे.