घरमुंबईप्रेम, शरीरसंबंध आणि हत्या; वर्ध्यात विद्यार्थांचा पोरखेळ

प्रेम, शरीरसंबंध आणि हत्या; वर्ध्यात विद्यार्थांचा पोरखेळ

Subscribe

वर्ध्यामध्ये अल्पवयीन मुला-मुलीच्या प्रेमसंबंधातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या मुलाने मित्राच्या सहाय्याने तिच्यावर बलात्कार करून हत्या केल्याचे समजते.

‘मे १६ बरसी की, तू १७ बरसा का…. एक, दो बरस जरा दूर रेहना…’, या गाण्याचा मतितार्थ म्हणजे आपण दोघेही अल्पवयीन आहोत आणि आता जवळ येण योग्य नाही, असाच होतो. हे जर वर्ध्यातील त्या नववीतील मुलीनेही समजले असते, तर कदाचित आज ती हयात असती. अवघ्या १५ दिवसांच्या प्रेम संबंधातून लग्नाचा हट्ट धरणाऱ्या त्या मुलीची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मुलगा दहावीत शिकणारा असून या दोघांची १५ दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकावर भेट झाली. तिथेच त्यांच्यात प्रेमही झाले. तिने लग्नाचा हट्ट धरला. त्याने नकार दिला. मात्र शरीरसंबंध सुरु ठेवले. सात दिवसांनी मुलीने लग्नासाठी आत्महत्येची धमकी दिली. यावर त्या मुलाने भयभीत होऊन मुलीला संपवण्याचा कट रचला.

अशी केली हत्या

लग्नासाठी तगादा लावणाऱ्या मुलीला प्रियकर त्याच्या मित्रासोबत दुचाकीवरून वर्ध्याजवळच्या पालोती शिवारात घेऊन गेला. तिथे मुलीची समजूत काढली. परंतू लग्नाचा हट्ट सोडत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तिच्यावर बळजबरी केली. आधी प्रियकर आणि नंतर त्याच्या मित्राने मुलीवर बलात्कार केला. ती कुठे काही बोलू नये म्हणून तिचा ओढणीने गळा आवळला. झटापटीत ओढणी फाटली. पण त्यांनी मुलीच्या गळ्यात स्क्रूड्रायव्हर खुपसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. कोणी ओळखू नये याकरता तिचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केला. तिथून ते दोघेही पळून गेले. शनिवारी रात्री दहा वाजता घडलेल्या या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी अवघ्या आठ तासात लावला.

- Advertisement -

अल्पवयीन आरोपी ताब्यात 

ही मुलगी सोमवारपासून बेपत्ता होती. तिच्या आई-वडिलांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसात तक्रार केली नाही. हत्येच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दोनही अल्पवयीन आरोपींना पकड्यानंतर ही सर्व कहाणी त्यांच्या समोर आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत हे प्रकरण स्थानिक गुन्हा शाखेकडे सोपवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -