घरमुंबईपालघरमधील वाहतूक कोंडीवर लवकरच तोडगा

पालघरमधील वाहतूक कोंडीवर लवकरच तोडगा

Subscribe

जिल्हाधिकार्‍यांनी घेतली दखल

पालघर, बोईसरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कैलाश शिंदे सरसावले आहेत. समस्या सोडविण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस शाखेसह स्थानिक प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे. आवश्यक वाटल्यास पोलीस बंदोबस्त वापरून समस्यांचे निराकरण करण्यात येईल असेही शिंदे म्हणाले.

पालघर जिल्हा मुख्यालयासह वसई तालुक्यातही समस्या मोठी बनली आहे. विरार,नालासोपारा,वसई, शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. वाहतूक शाखेचेही त्यावर नियंत्रण नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. जिल्ह्यातील बहुतेक शहरात पुरेशी सर्वाजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने खासगी वाहतूक वाढली आहे. प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून या समस्येबाबत वेळीच पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -