घरपालघरतनिष्का कांबळेचा मृत्यू वसई-विरार महापालिकेच्या चुकीमुळे!

तनिष्का कांबळेचा मृत्यू वसई-विरार महापालिकेच्या चुकीमुळे!

Subscribe

मात्र त्यांना तात्काळ जामीनही देण्यात आला होता. या वीजवाहक वाहिन्यांची दुरुस्ती केली नव्हती व त्या तीन फूट खोलऐवजी केवळ तीन इंचच रस्ता खोदून टाकण्यात आल्या होत्या, असेही अहवालात नमून करण्यात आले होते.

वसई: तनिष्का कांबळे मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात मंगळवार, 13 डिसेंबर रोजी सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालयाने महावितरण व वसई-विरार महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांना सुनावणीला उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचे आदेश दिलेले होते. मात्र आपल्याला नोटीस मिळाली नाही, असे कारण देत वसई-विरार महापालिकेचे अधिकारी या सुनावणीला अनुपस्थित राहिले. तर महावितरणने मात्र ही घटना वसई-विरार महापालिकेने रस्ता खोदल्यामुळे झाल्याचे म्हटले आहे. यावर याचिकाकर्त्यांच्या वतीने महापालिका तर दोषी आहेच; पण महावितरणनेही चुकीच्या पद्धतीने विद्युतवाहिनी टाकल्याने तनिष्का कांबळे हिला आपला जीव गमवावा लागल्याचे न्यायालयाला सांगितले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने महावितरण व वसई-विरार महापालिका यांना या प्रकरणी आपले म्हणणे लेखी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

विद्युत निरीक्षकांच्या चौकशी अहवालानंतरच दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी भूमिका अर्नाळा पोलिसांनी त्या वेळी घेतली होती. दरम्यानच्या काळात तनिष्काच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देतानाच; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीने जोर धरला होता. मात्र अर्नाळा पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम होते. विद्युत निरीक्षकांनीही तातडीची मदत देण्याचे निर्देश महावितरणला दिले होते. मात्र शवविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्याने चौकशी अहवालाला उशीर होणार असल्याची माहिती विद्युत निरीक्षकांनी दिली होती. या दिरंगाईमुळे गुन्हे दाखल करण्यास विलंब होत असल्याने परिसरातील नागरिकांनी विद्युत निरीक्षक व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. वाढत्या जनआक्रोशानंतर अर्नाळा पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी भारतीय दंड संहिता 304 अ व 34 अन्वये गुन्हा दाखल करून घेतला. मात्र यात दोषींच्या नावांचा उल्लेख नसल्याने आता विद्युत निरीक्षकांच्या चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यथावकाश विद्युत निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालानंतर पोलिसांनी अभियंता योगेश पगार, तंत्रज्ञ मधुकर गवळी व भूवेष चौधरी अभियंत्यांना दोषी ठरवले होते. मात्र त्यांना तात्काळ जामीनही देण्यात आला होता. या वीजवाहक वाहिन्यांची दुरुस्ती केली नव्हती व त्या तीन फूट खोलऐवजी केवळ तीन इंचच रस्ता खोदून टाकण्यात आल्या होत्या, असेही अहवालात नमून करण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान, तनिष्का कांबळे हिचा मृत्यू महावितरण व त्यांच्या ठेकेदाराच्या निष्काळजी आणि हलगर्जीमुळे झालेला आहे. महावितरणने भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम नियमाप्रमाणे केलेले नाही. भूमिगत वीजवाहिनी टाकताना महावितरणने नियमाप्रमाणे काम केलेले आहे किंवा नाही? त्यात काही त्रुटी तर राहिलेल्या नाहीत ना? हे पाहण्याची जबाबदारी महापालिकेचीही होती. मात्र ही जबाबदारी पालिकेनेही योग्य प्रकारे पार पाडलेली नाही. त्यामुळे महापालिकाही या घटनेकरता दोषी आहे, असे मत मांडत सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेवरील ही दुसरी सुनावणी होती.

काय आहे प्रकरण ?

- Advertisement -

विरार पश्चिम-बोळींज येथील मथुरा कॉम्प्लेक्समध्ये राहणारी तनिष्का कांबळे (15) ही विद्यार्थिनी 16 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परिसरातीलच ज्ञान सागर या शिकवणीकरता घरातून निघाली होती. त्या वेळी पावसामुळे रस्त्यात साचलेल्या पाण्यात वीज प्रवाह उतरल्याने तनिष्काला विजेचा धक्का बसला होता व त्यात तिचा मृत्यू झाला होता. तनिष्काच्या शवविच्छेदन अहवालातही विजेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आलेले होते. मात्र पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून घेतलेला नव्हता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -