आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी बेस्टच्या कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे मुंबई नगर आणि उपनगरातील नागरिक आणि चाकरमाण्यांना हालअपेष्टांना सामोरे जावे लागले. या संपामुळे धावत्या मुंबईची गती मंद झाली. रस्त्यांवर लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली.