भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगतदार वळणावर आहे. लॉर्ड्सवर होत असलेल्या या कसोटीत भारताने चौथ्या डावात इंग्लंडपुढे २७२ धावांचे आव्हान ठेवले आहे. याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अडचणीत आहे. २५ षटकांनंतर इंग्लंडची ५ बाद ७३ अशी अवस्था झाली. पहिल्या डावात नाबाद १८० धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार जो रूटला दुसऱ्या डावात मोठी खेळी करता आली नाही. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रूटचा अडथळा दूर केला. रूटने ६० चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने ३३ धावांची खेळी केली. इंग्लंडच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. रोरी बर्न्स आणि डॉम सिबले हे इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर खातेही न उघडता माघारी परतले. तर ईशांत शर्माने हसीब हमीद (९) आणि जॉनी बेअरस्टो (२) यांना पायचीत पकडले.
Big Wicket! 👌 👌@Jaspritbumrah93 scalps his second wicket as captain @imVkohli takes the catch. 👏 👏#TeamIndia strike right after the Tea interval. 👍 👍
England 67/5 as Joe Root gets out. #ENGvIND
Follow the match 👉 https://t.co/KGM2YELLde pic.twitter.com/m0EOOvRkB5
— BCCI (@BCCI) August 16, 2021
शमी, बुमराहची उत्कृष्ट फलंदाजी
त्याआधी पाचव्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात ६ बाद १८१ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. रिषभ पंतला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्याला २२ धावांवर ऑली रॉबिन्सनने बाद केले. रॉबिन्सननेच ईशांत शर्मालाही (१६) पायचीत पकडले. यानंतर मात्र मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. शमीने ७० चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५६ धावांची खेळी केली. त्याला बुमराहने ६४ चेंडूत नाबाद ३४ धावांची खेळी करत अप्रतिम साथ दिली. या दोघांनी ८९ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे भारताने दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित करत इंग्लंडपुढे विजयासाठी २७२ धावांचे आव्हान ठेवले.
हेही वाचा – विराट कोहलीच्या फलंदाजीवर गावस्करांची टीका, म्हणाले…