घरठाणेधर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचे नाव घेण्याचा गद्दारांना अधिकार नाही

धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचे नाव घेण्याचा गद्दारांना अधिकार नाही

Subscribe

आनंद परांजपे यांचा पलटवार

धर्मवीर आनंद दिघे हे त्याग, निष्ठा आणि समर्पणाचे मूर्तीमंत उदाहरण होते. त्यांचे नाव घेण्याचा नैतीक अधिकार शिंदे गटाला नाही.   धर्मवीर आनंद दिघे यांचे सर्वस्व हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होते.तर,शिंदे गटाचे सर्वस्व हे सत्ता हेच आहे. एका बाजूला आनंद दिघे असतानाच दुसऱ्या बाजूला राक्षसी महत्वकांक्षा, सत्तेची लालसा आणि गद्दारी याच्याशी निगडीत आहे. त्यामुळे नरेश म्हस्के यांना आपण थेट सवाल करीत आहोत की, धर्मकार्य करताना जे नैतीक अधिष्ठान अंगी असावे लागते; ते आनंद दिघे यांचे नाव घेणाऱ्या म्हस्के यांच्या अंगी आहे का? क्षणभर विश्रांतीमध्ये ज्यांनी आपल्या निष्ठेचा शर्ट उतरवला होता. त्यांची आनंद दिघे यांचे नाव घेण्याची लायकी आहे का?,अशा शब्दात राष्ट्रवादी काँगरेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेना- शिंदेगटावर पलटवार केला.

डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या एका विधानाचा आधार घेत शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. या टीकेचा जुने दाखले देत आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की,  गेले दोन दिवस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या वक्तव्यावरुन शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी कालची पत्रकार परिषद ऐकत असताना, धर्मवीर आनंद दिघे यांना शरद पवार यांनी टाडा लावला का? जामीन देताना शरद पवार हे न्यायाधीश होते का? असे सवाल उपस्थित करुन पुन्हा एकदा आपली बौद्धीक दळीद्रीपणाचे दर्शन जगाला घडविले आहे. मला या निमित्ताने एकच सांगायचे आहे की, शरद पवार हे १९६७ पासून सार्वजनिक जीवनात आहेत. त्यांनी व्यक्तीगत जीवनामध्ये अनेकांना मदत केलेली आहे. मात्र, त्यांनी ती कधीच कोणाला दाखवून त्याचे सार्वजनिक वक्तव्यं केले नाही. त्यामुळे १९८८-८९ साली ज्या काही घटना घडल्या; त्याबाबत वक्तव्ये करताना नरेश म्हस्के यांनी तारतम्य बाळगायला हवे. आनंद दिघे हे माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी गुरुवर्य, धर्मवीर आणि दैवत आहेत. पण,धर्मवीर आनंद दिघे यांचे जीवनकाल पाहिला तर त्यांनी आपल्या जीवनात त्याग, समर्पण आणि निष्ठा यांस त्यांनी अनन्यसाधारण महत्व दिले होते. त्यांनी आपली निष्ठा ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चरणी वाहिली होती. एका बाजूला आनंद दिघे असतानाच दुसऱ्या बाजूला राक्षसी महत्वकांक्षा, सत्तेची लालसा आणि गद्दारी याच्याशी निगडीत आहे, असे परांजपे म्हणाले.

- Advertisement -

आपले वडील स्व. प्रकाश परांजपे हे महापौरपदाचे उमेदवार होते. एक मताने त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आदेशावरुन  ठाणे पालिकेच्या 33 नगरसेवकांनी राजीनामे देऊन तीन वर्षे शिवसेना सत्तेच्या बाहेर बसली. हे धारिष्ट्र आताचे मुख्यमंत्री दाखवतील का? वारंवार शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे त्यांना राजीनामा देऊन निवडणूक लढविण्याचे आव्हान देत आहेत. लोकांसमोर जाऊन जनमत घेण्याबाबतही सूचवित आहेत. याबाबत मुख्यमंत्री आव्हान स्वीकारणार आहेत का?  त्यामुळे नरेश म्हस्के यांनी बोलताना तारतम्य बाळगावे. डॉ. जितेंद्र आव्हाड हे गेले 35 वर्षे एकाच नेत्याच्या मागे त्यांचे बोट धरुन चालत आहेत; ज्यांचे नाव आहे शरद पवार!  त्यामुळे एका बाजूला धर्मवीर आनंद दिघे जे अनेकांसाठी दैवत आहेत. दुसऱया बाजूला तुम्ही राक्षसी महत्वकांक्षेपोटी शिवसेना पक्ष फोडला; चिन्ह चोरले; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे म्हस्के यांना बोलण्याचा कुठलाही नैतीक अधिकार नाही. म्हणूनच शरद पवार यांच्याबद्दल बोलताना तारतम्य पाळा. म्हणूनच इतिहासाची उजळणी करायला लावू नका. धर्मवीर आनंद दिघे असताना म्हस्के यांना स्वीकृत नगरसेवकही केले नाहीत. आपण भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष होतात. पण, आपल्याला उमेदवारीही दिली नाही. सन 2002 मध्ये म्हस्के हे स्वीकृत नगरसेवक झाले आणि 2012 मध्ये लोकांमधून निवडून आले. राष्ट्रवादीबद्दल आणि शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भान बाळगा, असा मित्रत्वाचा सल्ला आपण त्यांना देत आहोत, असेही परांजपे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -