घरव्हिडिओमहाराष्ट्राने आमची काळजी घेतली, युपीवाले पाणी पण देत नाहीत

महाराष्ट्राने आमची काळजी घेतली, युपीवाले पाणी पण देत नाहीत

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातून युपी, बिहारमध्ये गेलेल्या मजुरांची अवस्था आगीतून फुपाट्यात पडल्यासारखी झाली आहे. उत्तर प्रदेशात एकाच वेळी गेलेल्या हजारो मजुराना घेऊन जाणाऱ्या खाजगी वाहनांमुळे उत्तर प्रदेशातील महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. हजारो मजुरांना तसेच राज्यात अडकलेल्या परप्रांतीयांना घेऊन निघालेले शेकडो खासगी वाहने रस्त्यात अडकून पडली आहे. हे मजूर त्यांच्याच राज्यात अन्नपाण्याला वंचित झाले आहे. त्यांना साधे पाणीही कोणी विचारत नसल्याचा या मजुरांचा आरोप आहे. या मजुरांनी तयार केलेल्या व्हिडीओ मध्ये महाराष्ट्र सरकारने केलेल्या सुविधेचे कौतुक केले असून त्यांच्याच राज्यातील सरकारचे मात्र वाभाडे काढले आहे.

- Advertisement -