- Advertisement -
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून होत असताना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. सत्तार यांनी शेतीची पाहणी केली तेव्हा ते स्वतः शेतातील पाण्यात उतरले होते. परंतु अद्याप त्यांना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती उद्भवली नसल्याचे वाटत आहे.
- Advertisement -