- Advertisement -
अंधेरी पोटनिवडणुकीमधून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेऊन महाराष्ट्राची परंपरा राखली, असे वक्तव्य शिवसेना नेते अनिल परब म्हणाले. अनिल परब यांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आभार मानले आहेत.
- Advertisement -