- Advertisement -
सरकारला जर आपल्या योजना यशस्वी करून हव्या असल्या तर त्याची पूर्व अट म्हणून लोकांच्या हातात पैसा खेळावा यासाठी प्रत्यक्ष रोख मदत लोकांना द्यायला हवी. तसेच भारतीय बँकिंगला त्यांनी बळ द्यायला हवे. यासाठी मोठ्या प्रमाणावर बँकांमध्ये नोकर भरती करण्याची आवश्यकता आहे. भारत सरकारने ताबडतोबीने बँकिंग उद्योगाशी निगडित सर्व प्रश्न सोडवले तरच बँकाही सशक्त होतील, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र स्टेट बँक फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांनी दिली आहे.
- Advertisement -