- Advertisement -
कोरोना संकट असताना, महाविकास आघाडी सत्तेत असताना भाजपची प्रत्येक कृती विरोधातली होती. सकाळी सरकार पडेल, पंधरा दिवस, आता पडेल नंतर पडेल अशी तुमची कृती होती. कधी एकाच्या हातात भोंगा दिला, हनुमान चालिसा, सुशांत सिंह राजपूत आणला, नुपूर शर्मा आणि अनेक गोष्टी केल्या परंतु सत्ता उलटली नाही. मंत्र्यांवर दबाव आणला पद घालवण्यासाठी अनेक प्रयत्न केले या सगळ्याचा पाढा भास्कर जाधवांनी विधानसभेत वाचला आहे.
- Advertisement -