- Advertisement -
महा विकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. मंत्रिमंडळ विस्तारात घराणेशाहीचा विस्तार झाला असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही जे काही करायचे ते रोखठोक करतो, भिंती रंगवण्याचे काम आम्ही करत नाही, असे सांगितले. वर्षा बंगल्यावरील भिंती रंगवल्याबद्दल ठाकरे यांनी फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
- Advertisement -