- Advertisement -
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. ममता बॅनर्जी यांनी मोदींविरोधातील सक्षम आघाडीवर भाष्य करताना थेट काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. तसेच युपीए मला माहिती नाही असे वक्तव्य ममता यांनी केलं आहे. यावरुन ममतांवर काँग्रेसमधील महाराष्ट्रातील ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी पलटवार केला आहे. ममता बॅनर्जी यांना भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसची गरज लागणारच असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. तसेच अहंकाराने नाही तर एकजुटीने लढलो तर मोदी सरकारचा पराभव करता येईल असा सल्ला ममता बॅनर्जी यांना दिला आहे.
- Advertisement -