- Advertisement -
उजनीच्या पाण्यावरून राजकारण केलं जातंय. हे मोठं षडयंत्र आहे. मात्र सोलापूरचे एक थेंब पाणी जरी कमी झाल्याचे सिद्ध झाल्यास मंत्रीपद,आमदारकी सोडा राजकारणातून संन्यास घेईन. इंदापूर माझा तालुका आहे. मात्र मला भाकरी मिळावी म्हणून दुसऱ्याची भाकरी पाळवण्याचे माझे संस्कार नाहीत. त्यामुळे सोलापूरकरांनी काळजी करू नका, उजनीचं एक थेंबही पाणी इंदापूरला दिले जाणार नाही, असे आश्वासन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
- Advertisement -