- Advertisement -
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पुढाकारामुळे आता रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रविवारी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊन देऊ नका, अशी मागणी केली. त्यामुळे राज्य सरकारने गुंडाळलेल्या नाणार प्रकल्पाची फाईल पुन्हा उघडणार असल्याची चर्चा असून यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंची भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, याचा निवडणुकीशी कोणताही संबंध लावू नका, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
- Advertisement -