- Advertisement -
राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांचे खंडन केले आहे. महाविकास आघाडीच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देत आरोपांचे खंडन केले आहे. महाविकास आघाडीच्या काळात असा कोणताही प्रयत्न झाला नाही, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
- Advertisement -