- Advertisement -
तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर अधिक परिणाम होणार आहे, अशी माहिती राज्याला देण्यात आली असून या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकार तयारीला लागले आहे. या अनुषंगाने एक टास्क फोर्स तयार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पेड्रियाटीक आयसीयू तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लहान मुलांसाठी आवश्यक संसाधनांची जमवाजमव करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. सध्या राज्यात रेमडेसिवीर मुबलक प्रमाणात असून राज्यात रेमडेसिवीरची कोणतीही कमतरता नसल्याचेही ते म्हणाले.
- Advertisement -