घरव्हिडिओ'महाराष्ट्रातील नागरिकांना नागरिकत्व गमवावे लागणार नाही'

‘महाराष्ट्रातील नागरिकांना नागरिकत्व गमवावे लागणार नाही’

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात एकाही नागरिकाला नागरिकत्व गमवावे लागणार नाही अशी हमी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. मुस्मिल बांधव, दलित बांधव आणि हिंदू बांधव कोणालाही नागरिकत्व कायद्यावरुन घाबरुन जाण्याची गरज नाही. कोणत्याही नागरिकाला नागरिकत्व जाईल अशी भीती असण्याची गरज नसल्याचं वक्तव्यही अनिल देशमुख यांनी केलं आहे. कोरेगाव भीमा इथे झालेल्या दंगलीचा तपास एनआयएकडे सोपवल्याचे कळले आहे. पण, ते पत्र अद्याप माझ्यापर्यंत आले नाही. पूर्व ग्रह मानसिकतेतून काही लोकांना गोवण्यात आले का? या संदर्भात अनेक लोकांनी शंका व्यक्त केली आहे. पण, केंद्राने राज्य सरकारला विचारात न घेता, एनआयएकडे तपास सोपवला असल्याची टीका ही अनिल देशमुख यांनी केली आहे.

- Advertisement -