- Advertisement -
गेल्या अनेक महिन्यांपासून शांत असलेला कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा प्रश्नावरून घेतलेल्या बैठकीनंतर कर्नाटकच्या सरकारला जाग आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील काही गावे कर्नाटकमध्ये येणार, असा दावा केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा चर्चेला आला असे म्हटल्यास कदाचित चुकीचे ठरणार नाही.
- Advertisement -