- Advertisement -
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आंदोलनाने आता हिंसक वळण घेतलं आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावमध्ये येऊ न देण्याची भूमिका घेतल्यानंतर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेनं आज दुपारी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. तर या हिंसाचारानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी नोंदविली
- Advertisement -