- Advertisement -
दोन दिवसांपासून कल्याणच्या मलंगगड रोडवर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उभ्या असलेल्या या गाड्यांमुळे रस्त्याने चालणार्या नारिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय गर्दीच्या वेळी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अवजड वाहनांच्या चालकांकडे पर्याय नसल्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी दहा ते बारा तास रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. याशिवाय नंबर लागायला २४ तासांपेक्षाही जास्त कालावधी लागत असल्याची माहिती एका वाहन चालकाने आपलं महानगरला दिली.
- Advertisement -