- Advertisement -
आर्यन खान प्रकरणामुळे बॉलीवूडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. मात्र यावरून सुरू झालेल्या राजकारणांच्या आरोप प्रत्यारोपामुळे हे प्रकरण दुसऱ्याच वळणावर जात आहे. त्यातच आता काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट एनसीबीचे विभागिय संचालक समीर वानखेडेंना लक्ष्य करत मालदि्वज आणि दुबईत जाऊन ते वसुली करत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे आर्यन खानवरून सुरू झालेल्या या प्रकरणात मालदिवज नाव का य़ावे असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. तर त्यामागे कारण आहे मालदि्वज मध्ये सहज उपलब्ध होणारे ड्रग्ज. तेथील ड्रग्ज तस्करी, त्याला मिळणारं स्थानिकांबरोबरच मालकांच, पोलिसांच बळ. यामुळेच बॉलीवूडकर नेहमी उठ सुठ मालदि्वजला का जातात याच कारणही आता समोर आले आहे.
- Advertisement -