- Advertisement -
दारणा नदीकाठच्या गावांमध्ये गेल्या आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या दोन कुटुंबांना आमदार सरोज आहिरे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी मृत गुंजन नेहरेच्या आईच्या भावनांचा बांध फुटला. बिबट्याची दहशत आणि हल्ले यावर आमदारांनी चार बळी घेतलेल्या बिबट्याला जेरबंद अन्यथा ठार करण्याची मागणी केली होती. त्यावर आमदार अजूनही ठाम असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.
- Advertisement -