- Advertisement -
महाविकास आघाडीमध्ये नाराजी आणि अस्थिरता असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येतो. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन घटक पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारमध्ये काँग्रेसपक्षातील आमदार नाराज आहे. आपल्याच मंत्र्यांमुळे काम होत नसल्याची तक्रार आमदारांची आहे. यामुळे हे १५ आमदार सोमवारी दिल्लीत दाखल झाले असून मंगळवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
- Advertisement -