- Advertisement -
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोकळा झाला आहे. १७ जिल्ह्यांमध्ये ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. तर मतमोजणी दुसऱ्या दिवशी १९ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहे. ज्या राज्यात कमी पर्जन्यवृष्टी असते अशा जिल्ह्यांमध्ये या निवडणुका घेण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
- Advertisement -