- Advertisement -
मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी रेल्वे ट्रॅकवर आल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस ही बदलापूर येथे अडकली आहे. गाडी नदीच्या जवळच असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. पण, आता लवकरत मदतकार्य पोहोचेल आणि तुमची सुखरुप सुटका होईल असं आश्वासन ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना पोलिसाकडून दिलं जातंय. ट्रेन ही सुखरुप ठिकाणी उभी आहे. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पाणी ओसरेल असं या पोलिसाकडून सांगण्यात आलं आहे.
- Advertisement -