- Advertisement -
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात संघर्ष पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेकडून मंजूर झाला नाही. यामुळे हे प्रकरण हायकोर्टात गेलं आहे. ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीसंदर्भात ठाकरे गट जनतेची दिशाभूल करत आहे. त्यांना उमेदवारी न देण्यास, उद्धव स्वतः जबाबदार आहेत, असा आरोप भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.
- Advertisement -