- Advertisement -
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)च्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानात शनिवारी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकूण ६५ संघटना या महामोर्चात सहभागी झाल्या होत्या. ‘संविधान बचाव‘चा नारा या मोर्चातून देण्यात आला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मुस्लिम संघटना समाविष्ट झाल्या होत्या. शिवाय, संघटनांसह बडे नेते ही या आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी दोन वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं.
- Advertisement -