- Advertisement -
‘अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. ते मंत्री आहेत त्याहीपेक्षा ते शिवसेनेचे आहेत. अशाने सरकार, शिवसेना कमजोर होईल, वाकेल, सरकारला तडे जातील आणि टपून बसलेले डोमकावळे आहेत, त्यांचा काही फायदा होईल, असं काहीही होणार नाही. असे अनेक घाव आम्ही पचवले आहेत. कायदेशीर, बेकायदेशीर सगळ्या प्रकारचे. त्यामुळे तुम्ही आमची चिंता अजिबात करु नये आणि अनिल परब यांची देखील चिंता करु नका’, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
- Advertisement -