- Advertisement -
त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये बंदची हाक दिली होती. मात्र अमरावती बंदला पुन्हा हिंसक वळण आले आहे. येथे मोठ्याप्रमाणात हिंसाचार आंदोलनकर्त्यांकडून होत असून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. दगडफेक सुद्धा होत आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीमध्ये होत असलेल्या हिंसाचारास राज्य सरकार कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.
- Advertisement -