- Advertisement -
ठाण्यातील विराज हॉस्पीटल मध्ये चुकीच्या पद्धतीने बिल वसूल करणे आणि गरिब रुग्णांची फसवणूक करण्याचे प्रकार चालू होते. असा आरोप मनसेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला होता. याबाबत स्थानिक नगरसेवकांनी देखील आवाज उठवला होता. काल रुग्णांच्या नातेवाईकाने ३ लाख बिल भरल्यानंतर ५२ हजार बिल भरले नाही म्हणून त्यांची रिक्षा ठेवून घेण्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी या हॉस्पीटलचे रजिस्ट्रेशन रद्द केले आहे.
- Advertisement -