- Advertisement -
नाशिक-औरंगाबाद रोडवर चिंतामणी ट्रॅव्हलच्या (खासगी) बसला आग लागून 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्यानंतर काही क्षणातच ही बस जळून खाक झाली होती. या पार्श्वभूमीवर आज विधान परिषदेत चर्चा करण्यात आली असून, बसच्या पासिंगवेळी सर्व त्रूटी तपासल्यानंतरच बसला परवाना देणे बंधनकारक करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
- Advertisement -