- Advertisement -
शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले आमदार शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. खासदार संजय राऊत यांच्यामुळेच शिंदे गटात गेलो असल्याचे आमदारांकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी, राष्ट्रवादीकडून होणाऱ्या त्रासामुळे फारकत घेतली असल्याचा आरोप केला होता. आता राऊतांवर आरोप करत असल्यामुळे शिंदे गटाने एकदा ठरवावं कोणत्या कारणामुळे शिंदे गटात गेलोय, आमदार गोंधळले आहेत. त्यांनी कार्यशाळा घेऊन ठरवावं असा टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे
- Advertisement -