- Advertisement -
शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला आहे. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेला निधी सोमय्यांनी लाटला असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांत एक मेमोरियल बनावं संग्रहालय करावे अशी मागणी करण्यात येत होती. मुंबईच्या समुद्रात ते आयएनएस विक्रांत होते महाराष्ट्र सरकारने २०० कोटी द्यावे अशी मागणी भाजप आणि अनेकाकंकडून झाली होती. दिल्लीत संरक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी सर्वपक्षीय खासदार होते. राहुल शेवाळे, आढळराव पाटील, खासदार बारणे होते. त्यात सध्याचे भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे भाजपचे महात्मा किरीट सोमय्यासुद्धा होते परंतु पैसे जमा होऊ शकले नाही. बोट भंगारात जाण्याची वेळ आली होती.
- Advertisement -