- Advertisement -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे बाधितांच्या रुग्णसंख्येत घट झाली. मात्र, याचा सर्वात अधिक फटका हा हातावर पोट असणाऱ्यांना बसला आहे. असाच फटका बिडी बनवणाऱ्या महिलांना देखील बसला आहे. या महिलांना एकवेळचे अन्न मिळणे ही कठिण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला दर महिना पाच हजाराची मदत करावी, अशी मागणी महिलांकडून जोर धरु लागली आहे.
- Advertisement -