- Advertisement -
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासामध्ये राज्यपाल कसा नसावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भगतसिंह कोशारी, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. तसेच जर महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने राज्यपालांना परत बोलावण्याची विनंती केंद्राला केली असती, अशी टीका शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
- Advertisement -