- Advertisement -
सगळीकडे लॉकडाऊन असताना रात्रीच्या वेळी दादरा नगर हवेलीकडे जाण्याचा प्रयत्न मुंबईतील तिघांच्या जीवावर बेतला. पालघर जिल्ह्याच्या काही भागात सध्या चोर, दरोडेखोर फिरत असल्याच्या अफवांना उधाण आले आहे. गेले काही दिवस या अफवांवर विश्वास ठेवून लोक रात्रीची गस्त घालत आहेत. गुरुवारी रात्री तर गावकऱ्यांनी तिघांचा जीव घेतला. धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांनी पोलिसांवरही हल्ला केला आणि पोलिसांच्या गाडीतच तिघांना दगड, बॅट आणि बांबूने ठेचून तिघांची हत्या केली.
- Advertisement -