- Advertisement -
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले. नारायण राणे यांच्या वक्तव्याला कोणीही कवडीची किमंत देत नाही. जे स्वतःला आणि स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत, त्यांना दुसऱ्यांबद्दल बोलण्याचा काय अधिकार? तसेच राणे भाजपमध्ये गेल्यामुळेच भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, अशीही टीका जाधव यांनी केली.
- Advertisement -