देशाची आर्थिक राजधानी असलेल्या तसेच आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईत तब्बल ७३.१८ कोटी रुपयांच्या पाण्याची चोरी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जवळपास ११ वर्षे चाललेल्या या पाणी चोरी प्रकरणी ६ जणांविरोधात आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आझाद मैदान पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
#Maharashtra: Mumbai's Azad Maidan police has registered FIR under sections 379 and 34 of Indian Penal Code against 6 persons for theft of groundwater valued around Rs 73.18 Crores over a period of 11 years; further investigation underway.
— ANI (@ANI) October 17, 2019
आरोपींचा शोध सुरु
तब्बल ७३ कोटी रुपयांच्या पाण्याची चोरी झाल्याने आझाद मैदान पोलिसांनासुद्धा धक्का बसला आहे. मागील ११ वर्षांपासून ही चोरी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.