सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात भाजप नेते आणि माजी आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्या निलंबनाची मागणी करणारे पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. मुंबई पोलिसांनी सुरुवातीपासूनच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी अपघाती मृत्यू अशी नोंद केली, असे भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे कलम ३११(२) (ब) आणि (क) चा वापर करुन पंतप्रधान आयपीएस अधिकाऱ्याला काढून टाकू शकतात, असे भातखळकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
I have appealed PM @narendramodi to invoke article 311 of Constitution to dismiss Mumbai police commissioner Param bir Singh and DCM Trimukhe who are derailing, misleading the investigation of Sushant Singh Rajput case.#SSRDidntCommitSuicide pic.twitter.com/qa844m9ZmW
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 27, 2020
काय आहे पत्रात
देशाच्या आर्थिक राजधानीतील जनहिताचे प्रकरण असल्यामुळे आपली माफी मागत हस्तक्षेप करत आहे. सध्या चर्चेत असलेल्या सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सीबीआय चौकशीला परवानगी दिली आणि एफआयआर वैध ठरवला. मुंबई पोलिसांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत या तपासात कोणतीही प्रगती केली नव्हती. सुप्रीम कोर्टाने उपलब्ध माहितीच्या आधारावर चौकशीची परवानगी दिली. पण मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि अभिषेक त्रिमुखे यांच्या नेतृत्त्वात पोलिसांनी कोणतीही प्रगती केली नाही आणि त्यामुळे न्यायावर परिणाम झाला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीवर सुप्रीम कोर्टानेही नाराजी व्यक्त केली होती. अनेक बाबी समोर येऊनही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही.
परमबीर यांना हाकला…
सुशांत सिंह तपास प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि DCP त्रिमुखे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे आता उघड होते आहे.
घटनेचे कलम 311 वापरून परमबीर यांची हकालपट्टी करावी अशी विनंती मी मा. पंतप्रधान @narendramodi यांना केली आहे. pic.twitter.com/xgOFgqlt4A— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 27, 2020
भातखळकर यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोपही लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांकडून माध्यमांसमोर मृताची खासगी माहिती सार्वजनिक करण्यात आली, जो कोर्टाच्या नियमांचा अवमान आहे. बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वॉरंटाईन करण्यात आले. त्यामुळे परमबिर सिंह हे कुणाला तरी क्लीनचिट देण्यासाठी उत्सुक असल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणाचे तपास अधिकारी त्रिमुखे यांचे वर्तनही संशयास्पद असून ते रिया चक्रवर्तीच्या संपर्कात होते. सोबत अतुल भातखळकर यांनी त्यांचा एक व्हिडिओदेखील ट्विट केला आहे.
हेही वाचा –
Corona Virus : धोक्याची घंटा, भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे!