मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस आणि पालिका यंत्रणा पुन्हा खडबडून जागी झाली आहे. एवढे असूनही नागरिक कोरोना निर्णयांना घेऊन अजूनही निष्काळजी असल्याचेच दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी लाईव्हच्या माध्यामातून आठ दिवसात फरक जाणवला नाही तर राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा अल्टिमेटम दिला आहे.