दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एकदा पुन्हा भाजपवर मोठा हल्ला केला आहे. हिंदुत्वाचा विचार करणारा पक्ष म्हणजे भाजप. भाजप मुस्लिमांचा राग करणारा पक्ष असल्याचे केजरीवाल यांनी टीका केली आहे. दिल्लीतील बदरपूर परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी असे वक्तव्य केलं आहे. याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) ला मत देण्याचीही त्यांनी आवाहन केले. येत्या निवडणुकीत आम आदमी पार्टी लोकसभेत सात जागा जिंकणार असा आत्मविश्वास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या यात्रेदरम्यान त्यांनी भाजप सरकारवर अनेक टीका केल्या.
काय म्हणाले केजरीवाल
भाजप ने दिल्लीमध्ये ३० लाख मतगारांची नावे मदतदार यादीतून काढली आहेत. यामधील १५ लाख लोक हे यूपी-बिहार मधील, ८ लाख मुसलमान आणि ४ लाख व्यापाऱ्याचा समोवेश आहे. भाजपचा राग मनात असल्यामुळे मुस्लिम मतदाराकांचे वोटिंग करण्याचा अधिकारी काढण्यात आला. जीएसटीमुळे व्यापारी वर्ग नाराज आहे त्यामुळे ते आता भाजपाल मत देणार नाहीत. उत्तर प्रदेश आणि बिहार येथील नागरकिना दिल्लीतून हटवले जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व मतदारांचे नाव आम्ही मतदार यादीत टाकू असे आश्वासनही केजरीवाल यांनी यावेळी दिले.