उत्तर प्रदेशमधील औरैयामधील अपघातानंतर मध्यप्रदेशातील सागर जिह्यात एक ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. मध्यप्रदेशमधील या अपघातामध्ये पाच मजुरांचा मृत्यू झाला असून जवळपास २० जण जखमी झाले आहेत. हा ट्रक मजुरांना महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशकडे घेऊन जात होता, अशी माहिती एएसपी प्रवीण भूरिया यांनी दिली आहे.
5 migrant workers killed in a road accident near Banda (Sagar district) today, after the truck they were traveling in, overturned. They were going from Maharashtra to Uttar Pradesh: ASP Praveen Bhuria #MadhyaPradesh
— ANI (@ANI) May 16, 2020
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पपाच मृत्यू झालेल्यापैकी तीन महिला आणि दोन पुरुष आहेत. सर्व मजूर आपल्या कुटुंबियांसह ट्रकमधून प्रवास करत होते.
आज पहाटे ३.३०च्या सुमारास उत्तरप्रदेशातील औरैयाजवळ देखील भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात २४ मजुरांचा जागीच मृत्यू असून २२ मजूर जखमी झाले आहेत.
हेही वाचा – CoronaVirus: कोरोनापासून पूर्णपणे बरे झाल्यानंतरही आरोग्याच्या या समस्या…