आंध्र प्रदेशातील औषधाच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ही घटना एलुरू जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथे घडली आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी चार जण बिहारमधील स्थलांतरीत कामगार होते.
Andhra Pradesh | Six killed & 12 injured in a fire accident at a chemical factory in Akkireddigudem, Eluru, last night. The fire broke out due to leakage of nitric acid, monomethyl: Eluru SP Rahul Dev Sharma
(Visuals from last night) pic.twitter.com/sRwkTRrLQs
— ANI (@ANI) April 14, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, हे कामगार रात्रपाळीचे काम करत होते. अचानक आग लागल्याने कामगारांनी पळ काढला. मात्र, यामध्ये सहा जणांचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला आहे. वायू गळतीमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्यानंतर ही माहिती अग्निशमन दलाल देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दोन तासांमध्येच आग नियंत्रण मिळवलं.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी आगीच्या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रूपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तसेच प्रत्येक गंभीर कामगाराला ५ लाख रूपये आणि किरकोळ जखमींना २ लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याचसोबतच अधिकाऱ्यांनी या कामगारांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दिल्या आहेत.
#UPDATE | Eluru fire accident at chemical factory | Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy announces ex-gratia of Rs 25 lakh to the kin of the dead, Rs 5 lakhs for the critically injured, and Rs 2 lakhs to the ones who sustained minor injuries
— ANI (@ANI) April 14, 2022
हेही वाचा : IPL, Rohit Sharma: मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा पराभव, रोहित शर्मा झाला भावूक