संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर गुरुवारी विरोधी पक्षांनी संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात बाराहून अधिक राजकीय पक्ष सहभागी झाले होते. यावेळी पहिल्यांदाच राज्यसभेत खासदारांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी सरकारवर केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राज्यसभेत पहिल्यांदा खासदारांना धक्काबुक्की करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावण्यात आलं आणि खासदारांना धक्काबुक्की करण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. सभापतीची जबाबदारी सभागृह चालवण्याची असते. देशाचे पंतप्रधान आज देश विकण्याचे काम करत आहेत, दोन-तीन उद्योगपती देश विकत आहेत. संसदेच्या आत विरोधकांना बोलू दिले जात नाही आहे, असं राहुल गांधी म्हणाले. देशातील ६० टक्के लोकांचा आवाज दाबला जात आहे, राज्यसभेत खासदारांशी गैरवर्तन करण्यात आले. आम्ही सरकारला पेगाससच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास सांगितले, आम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा, महागाई मुद्दा उठवला. पण यावर चर्चा करण्यात आली नाही. ही लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
The Parliament session is over. As far as 60% of the country is concerned there has been no Parliament session. The voice of 60% of the country has been crushed, humiliated and yesterday in the Rajya Sabha physically beaten: Rahul Gandhi, Congress pic.twitter.com/39uXTIkpKn
— ANI (@ANI) August 12, 2021
सरकार दररोज लोकशाहीची हत्या करतंय – राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यसभेत शेवटच्या दिवशी मार्शल लॉ लागू करण्यात आला होता, असे वाटत होते की आपण पाकिस्तानच्या सीमेवर उभे आहोत. सरकार दररोज लोकशाहीची हत्या करत आहे, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली. आम्ही या सरकारविरोधात लढा देत राहू, असं राऊत म्हणाले.
The opposition didn’t get a chance to present their views in Parliament. Yesterday’s incident against women MPs was against democracy. It felt like we were standing at the Pakistan border: Sanjay Raut, leader, Shiv Sena pic.twitter.com/MZYeQ1Qju9
— ANI (@ANI) August 12, 2021