घरदेश-विदेशकोरोनामुळे स्मरणशक्ती गेली, आता काही आठवत नाही; सत्येंद्र जैन यांचा अजब युक्तीवाद

कोरोनामुळे स्मरणशक्ती गेली, आता काही आठवत नाही; सत्येंद्र जैन यांचा अजब युक्तीवाद

Subscribe

पैसा कुठून आणला असा प्रश्न ईडीने विचारला होता. त्यावेळी सत्येंद्र जैन यांनी मला कोरोना झाला होता त्यामुळे स्मृती  गेल्याचं सांगितलं. 

मला कोरोना झाला होता त्यामुळे माझी स्मृती गेली, असं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटलं आहे. ईडीने त्यांना ३० मे रोजी अटक केली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज दिल्लीतील न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीचा निकाल १८ जून रोजी जाहीर होणार आहे. (Corona lost my memory, no longer remembering anything; Strange argument of Satyendra Jain)

पैसा कुठून आणला असा प्रश्न ईडीने विचारला होता. त्यावेळी सत्येंद्र जैन यांनी मला कोरोना झाला होता त्यामुळे स्मृती  गेल्याचं सांगितलं. ईडीचे वकिल अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.वी.राजू यांनी न्यायालयाला ही माहिती दिली.

- Advertisement -

सत्येंद्र जैन आणि आपला कवि आणि आपचे माजी नेते कुमार विश्वास यांनी देखील या मुद्यावरुन डिवचलं. ट्विटरवर एक इमोजी शेअर करत हवालाचे पेपर पाहून मंत्र्यांनी करोनामुळं स्मृती गेल्याच सांगितलं. आता जामीन अर्जावर १८ जूनला निर्णय येणार असं कुमार विश्वास म्हणाले.

सत्येंद्र जैन यांना ४.८१ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलीय. सत्येंद्र जैन यांना ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणी ३० जून रोजी अटक केली होती. कोलकाता येथील बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप सत्येंद्र जैन यांच्यावर आहे. सत्येंद्र जैन यांच्या विरोधात सीबीआयनं देखील गुन्हा नोंदवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -