घरCORONA UPDATEधक्कादायक! मुलांच्या भविष्याची चिंता, भांडणातून पतीने केली पत्नीची हत्या

धक्कादायक! मुलांच्या भविष्याची चिंता, भांडणातून पतीने केली पत्नीची हत्या

Subscribe

आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी सर्वच पालकांना असते. आयुष्यभर मुलांसाठी झटणाऱ्या पालकांमध्ये अनेकदा यावरून वादही होतात. मात्र मुलांच्या भविष्याची काळजी करणाऱ्या अशाच एका दाम्पत्यांमध्ये या मुद्द्यावरून भांडणं झाली आणि हे प्रकरण विकोपाला गेले. या भांडणातून पतीने चक्क पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीमध्ये घटला आहे. दिल्लीतील मदिपूर परिसरातील पोलीस ठाण्यात शनिवारी एका ३४ वर्षीय इसमाने स्वतःला समर्पित करून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. शुक्रवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यानंतर आपल्या पत्नीचा खुन केल्याची माहिती राहीसूल आझम या इसमाने पोलिसांना सांगितली. आझम हा जहांगिरीपुरातील एका चप्पलच्या दुकानात कामाला असून त्याने गुलशन (वय ३९) या आपल्या पत्नीचा खुन केल्याची माहिती येथील पोलिसांनी दिली.

नेमकं काय घडलं

शुक्रवारी मध्यरात्री साडेतीन वाजता पोलिसांना नवरा-बायको भांडत असल्याचा फोन आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तिथे त्यांना महिलेचा मृतदेह आढळून आला. आझमने आपल्यापेक्षा ५ वर्षांनी मोठ्या असलेल्या गुलशनसोबत लग्न केले होते. त्या दोघांना तीन मुलं होती. तर गुलशन पहिल्या पतीपासून ६ मुलं होती. दोघांमध्ये मुलांच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू होती. त्यामधील मतभेद समोर येऊ लागले. त्याचे रुपांतर भांडणात झाले. आझमने स्वतःवरचा ताबा सोडत गुलशनवर हल्ला चढवला. आझमने त्यांच्या पत्नीच्या डोक्यात काठीने वार केला असता तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आझमला ताब्यात घेतले असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

रतन टाटांची लव स्टोरी… अन् अविवाहित राहण्याचा निर्णय!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -