मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळवण्यात अपयश आलेल्या भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आज, बुधवारी त्यांचा राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे सोपवला आहे. तर राज्यात सरकार बनवण्यासाठी भाजप दावा करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी शिवराज सिंग चौहान म्हणाले की, सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे संख्याबळ नाही. त्यामुळे ते सरकार बनवण्यासाठी दावा करणार नाही. त्यांनी निवडणुकीतील त्यांचे अपयश स्विकारले आहे. तसेच त्याची नैतिक जबाबदारीही मुख्यमंत्री म्हणून माझी असल्याचे चौहान यांनी म्हटलं आहे. यावेळी आता मी मुक्त झालो आहे, अशी उद्वीग्न प्रतिक्रिया शिवराज सिंग चौहान यांनी दिली.
Shivraj Singh Chouhan: Na haar mein, na jeet mein, kinchit nahin bhaybhit main, kartavya path par jo bhi mile, yeh bhi sahi woh bhi sahi https://t.co/8a1VR4T5wP
— ANI (@ANI) December 12, 2018
अटलजींच्या कवितेच्या ओळी
दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या ओळी चौहान यांनी म्हटल्या आहेत. ना हार में, ना जीत में, किंचित नहीं भयभीत मैं, कर्तव्य पथ पर जो भी मिला, ये भी सही वो भी सही, या ओळी त्यांनी सांगितल्या. तसेच काँग्रेसच्या कमलनाथ यांना यशासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.